माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते, आणि त्याचे विचार हे जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्वच नेहमी आठवण ठेवतात. आपण पाहू शकता आपल्या पूर्वजांचे नाव आपल्याला आठवत नसतील पण स्वामी विवेकानंद ,अश्या महान व्यक्तिमत्वांची आठवण ठेवल्या जाते. का असेल बर असे. कारण त्यांनी जिवंत पणी जगात सुंदर विचार आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनावर कोरून निघून गेले म्हणून आजही त्यांना इतिहासात आठवण केल्या जाते. म्हणतात ना “मरावे परी कीर्ती रुपी उरावे”. बस त्याच प्रमाणे आपण शरीराने तर या संसाराला त्यागू पण चांगले विचार जर पेरून गेलो तर लोकांच्या मनात आपण नेहमीसाठी जिवंत राहू.